साडे ग्रामपंचायत अपहार प्रकरणातील माजी सरपंच जयाबाई जाधव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडुन अटकपुर्व जामीन मंजुर…


करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील साडे येथील ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाच्या खात्यातील रकमेच्या कथित अपहाराप्रकरणी तत्कालीन सरपंच आणि माजी पंचायत समिती सदस्या जयाबाई दत्तात्रय जाधव (रा. साडे, ता. करमाळा) यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला गेला आहे.

१४ व्या वित्त आयोगाच्या खात्यातील रु. ७१ लाख ४२ हजार ३९५ च्या अपहाराचा ठपका साडे ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच जयाबाई दत्तात्रय जाधव व इतरांवर आहे. याबाबत जयाबाई जाधव यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यांनंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर दि. ३० एप्रिल रोजी ३० हजारांच्या जात मुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. न्यायमुर्ती राजेश पाटील यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

यावेळी जयाबाई जाधव यांच्या वतीने ॲड. सचिन देवकर, ॲड. बालाजी किसन पिंपरे (करमाळा) व ॲड. अशोकन यांनी काम पाहिले तर शासकीय अभियोक्ता म्हणून ॲड. पल्लवी दाभोळकर यांनी काम पाहिले.

.

.

.

Advertisement

.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page