केत्तूरच्या नेताजी सुभाष महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९६.६६ %
करमाळा, केतुर प्रतिनिधी रवि चव्हाण – फेब्रु/मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार दि. ५ मे रोजी दु. १ वा. ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. या परीक्षेत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था (कोल्हापूर) संचलित तालुक्यातील केतूर नं.२ येथील नेताजी सुभाष कनिष्ठ महाविद्यालयाचा ९६.६६ % निकाल लागला.
या निकालात मुलींनीच बाजी मारली. यावेळी कु. यशोदा विठ्ठल खाटमोडे ही ७९.१७ % गुण मिळवून प्रथम, कु. किरण दादा मांढरे ही ७५.१७ % गुण मिळवून द्वितीय तर कु.गीतांजली महादेव काळे ही ७०.३७ % गुण मिळवून तृतीय आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. एस. बी. सामंत. प्रा. एस. एच. कानगुडे, प्रा. एन. एम. पवार, प्रा. श्रीमती एम. एस. साळुंखे, प्रा. के. पी. धस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे प्राचार्य के. एल. जाधव, पर्यवेक्षक बी. जी. बुरटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ॲड. संतोष निकम, उपाध्यक्ष प्रशांत पांढरे तसेच सरपंच सचिन वेळेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
.
.
.
.